माणसाने आपल्यातली एक तरी कला नेहमी जिवंत ठेवावी.. मग एक वेळ येते, सगे सोयरे नातेवाईक पोरं बाळं शेजार पाजार सहकारी सहचारी कोणी कोणी सुद्धा सोबत नसलं तरीही ती कला आपल्याला जिवंत ठेवते....
माझ्या सासूबाईंच्या हाताला चव भारी- आणि ती एक गोष्ट- स्वयंपाक- पदार्थ करणे- त्या अन्नपूर्णेचा हात त्यांनी कधीही नाही सोडला.
आज आम्हाला कोणाला वेळ असला नसला तरी ती गोष्ट, ती कला, ती देवी त्यांना एकटं पडू देत नाही. पहिल्यांदा म्हणून त्यांनी नानकटाई घरी केली. आणि शप्पत सांगते, मी आजवर खाल्लेली ही बेस्ट नानकटाई होती. कोणाला वाटेल त्यात काय मोठंसं.... नानकटाई काय आजकाल बायका वाईन सुद्धा घरी बनवतात-
पण मुद्दा नानकटाईचा नव्हताच की! मुद्दा तर त्या कलेचा होता जिचा हात आपण सोडू नये आणि जी आपला हात सोडत नाही..
खूप भारी.. खाऊन आम्हाला आणि आम्हाला डोळे मिटून खाताना बघून त्यांना खूप मजा आली.. बनाते रहो खिलाते रहो.
# #happiness
No comments:
Post a Comment